या राशीच्या लोकांनी चुकुनही घालू नये चांदीची अंगठी…नाहीतर बघा काय काय घडू शकते

अध्यात्म

मानवाचे जीवन हे वेगवेगळ्या गोष्टीला जोडले आहे. मग ते नवग्रह असेल नक्षत्र असेल वेगवेगळ्या प्रकारच्या रूढी आणि धर्म परंपरा असेल या सर्वांचा प्रभाव मानवाच्या जीवनावर पडत असतो. वेगवेगळे रंग अनेक प्रकारचे धातू विधी विधान आणि तिथी यांचा प्रभाव मानवी जीवनावर पडत असतो.

विश्वातील प्रत्येक व्यक्तीचा संबंध नवग्रहाशी येतो आणि तसाच तो ईश्वराशी येतो. जर आपण चांदीच्या वस्तू वापरत असाल तर एक गोष्ट आपण लक्षात ठेवा. चांदीवर शुक्र आणि चंद्र यांचा प्रभाव असतो. आणि म्हणून ज्या लोकांना अतिशय राग येतो जे शीघ्र कोपी असतात आशा लोकांनी चांदीची अंगठी अवश्य घालावी. तसेच चांदीची चैन सुद्धा गळ्यामध्ये घालू शकतात.

अशी ही चांदीची अंगठी व चैन घातल्याने या लोकांना त्यांच्या रागावर नियंत्रण मिळवता येईल. कारण शुक्र आणि चंद्र हे शितल असतात आणि हे माणसाच्या क्रोधावर गारवा निर्माण करण्याच काम हे करत असतात.आणि अशा या 2 ग्रहांचा प्रभाव असणारी ही वस्तू कोणत्या लोकांनी घालायला हवी आणि कोणत्या लोकांनी घालायला नको याचे जोतिष शास्त्रात अनेक नियम ठरलेले आहेत.

हे वाचा:   तुळशीजवळ चुकूनही ठेवू नका या पाच वस्तू ; संपूर्ण घर होईल बरबाद घरात येत राहील गरिबी ….!!

आणि या नियमानुसार 3 राशी आहेत की ज्यांनी चांदीची अंगठी वापरू नये. चांदीची अंगठी वापरल्याने यांच्या जीवनावर कोणता प्रभाव पडू शकतो हे आज आपण जाणून घेणार आहोत. चांदीची अनेक गुणधर्म आहेत अनेक फायदे आहेत. चांदीची अंगठी जर तुम्ही वापरत असाल तर चांदीच्या अंगठी वापरल्यामुळे चांगले परिणाम घडतात.

मात्र अश्या 3 राशी आहेत ज्यांना चांदीची अंगठी घातल्याने त्यांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम घडतात. यात पहिली राशी मेष राशी आहे. जर आपली मेष राशी असेल तर आपण चुकूनही चांदीची अंगठी घालू नका. या राशीच्या लोकांनी चांदीची अंगठी घातल्याने तुमच्या जीवनातील सुख आणि शांती निघून जाईल. समृद्धी पैसा आपल्या घरात टिकणार नाही.

चांदीची अंगठी घालणे हे आपल्यासाठी अतिशय अशुभ मानण्यात आलेले आहे. जोतिष शास्त्रानुसार आपण चांदीची अंगठी किंवा चांदीचा ग्लास अजिबात वापरू नका हे 2 वस्तू तुमच्यासाठी खूप अशुभ आहेत. दुसरी राशी सिंह राशी आहे. आपल्या सर्वांना माहिती असेल की सिंह राशी सूर्याचा सर्वाधिक प्रभाव असणारी रास आहे.

आणि म्हणून सिंह राशीच्या लोकांनी जर चांदीची अंगठी घातली तर त्यांना उदयोग व्यवसायात मोठं नुकसान सहन करावा लागू शकतो. एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे सिंह राशीच्या लोकांनी जर चांदीची अंगठी घातली तर त्यांची आर्थिक स्थिती हळूहळू डबघाईला येते मात्र हे त्यांना थेटपणे कळत नाही.

हे वाचा:   स्वप्नामध्ये साप दिसणे, काय असतात शुभ संकेत,यामागील नेमका काय असतो अर्थ? नक्की जाणून घ्या उपयुक्त अशी माहिती ….!!

त्यांच्या संपत्तीत कमतरता येऊ लागते त्यांचा पैसा हळूहळू कमी होऊ लागतो. म्हणून सिंह राशीच्या लोकांनी चांदीची अंगठी घालू नये.
तिसरी राशी धनु राशी आहे. जर आपली रास धनु रास असेल तर जोतिष शास्त्रानुसार आपण चांदीची अंगठी घालणे अतिशय अशुभ मानले जाते. अस मानतात की जर तुम्ही चुकूनही अशी अंगठी घातली तर या लोकांना मोठया दुर्घटनेला सामोरे जाव लागत.

आणि अशी ही दुर्घटना हा भविष्यामध्ये तुमच्या पुढे अनेक प्रकारचे अडचणी निर्माण करतो. आणि म्हणून जोतिष शास्त्रानुसार तुम्ही ऐकाल तर धनु राशीच्या लोकांनी चांदीची अंगठी अजिबात घालू नये. तर अश्या होत्या या 3 राशी या3 राशींनी चुकूनही चांदीची अंगठी घालू नये. जर घातली लगेच ती अंगठी काढून ठेवा. नाहीतर त्यांच्या जीवनात कोणता परिणाम होऊ शकतो हे आज आपण पाहिल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *