वारूळातील हा किडा तुम्हाला बनवू शकतो करोडपती…करा फक्त हा उपाय

अध्यात्म

तुमच्या घराच्या जवळपास जर एखाद वारूळ असेल की ज्यामध्ये काही विशिष्ट प्रकारचे किडे असतील. जर तुमच्या आसपास असे वारूळ असेल तर या वारूळासंबंधी एक तांत्रिक उपाय आपण आवर्जून करा. हा उपाय कोणत्याही एकादशीला किंवा पौर्णिमेला, शुक्रवारचा आणि मंगळवारचा दिवस पाहून आपण करू शकता. हा उपाय माता लक्ष्मी सं-बंधित आहे.

हा उपाय कोणी करावा तर ज्यांच्या घरात पैसा तर भरपूर आहे मात्र त्या पैशातून जे काही इच्छा आहे ते इच्छा पूर्ण होत नाही. जसे घर निर्मितीमध्ये सतत काहीना काही अडथळे येतात किंवा अनेकांना कुठे तरी जागा घ्यायची आहे मात्र त्यांच हे स्वप्न पूर्ण होत नाही. तर असे लोक सुद्धा हा उपाय आवर्जून करू शकतात.

तसेच ज्यांच्या घरात अठरा विश्व दारिद्र्य, अलक्ष्मी व गरिबीचा तुम्ही सामना करत आहात तर ही गरिबी घालवण्यासाठी आपण हा उपाय करू शकता. चला तर जाणून घेऊया हा उपाय कसा करायचा. हा उपाय करण्यासाठी आपल्याला 1 नारळ लागणार आहे आणि या नारळाचे दोन भागात तुकडे करायचे आहेत.

हे वाचा:   आपली चांगली वेळ येण्यापूर्वी श्री स्वामीं समर्थ महाराज आपल्याला देतात हे 10 संकेत …..!!

तसेच एक-एक मूठ सात प्रकारचे धान्य म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ किंवा मटकी, मूग असे हे सात प्रकारचे धान्य मिक्स करून एखाद्या पिशवीमध्ये गोळा करायचं आहे. आणि जो फोडलेला नारळ आहे त्यात गुळाचा एक खडा आणि सोबत एक रुपयाचा सिक्का त्यात टाकायचं आहे. आणि ही संपूर्ण सामग्री घेऊन आपण या वारूळाजवळ जायचं आहे.

तसेच त्या वरूळाला काही इजा होणार नाही याची काळजी घेत आपण ही संपूर्ण सामग्री त्या ठिकाणी ठेवायची आहे. हे ठेवल्यानंतर त्यातील जे किडे आहेत ते बाहेर हळूहळू निघतील आणि हे सर्व काही खाऊन टाकतील. हे क्रिया आपण शक्य तो सकाळी करा. कारण कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपण स्वच्छ स्नान करणे गरजेचे आहे.

तसेच ही किडे जास्त सकाळच्या वेळी बाहेर पडतात. आणि हे धान्य तुम्ही वारूलाजवळ टाकलात त्यातलचं थोडे धान्य आपण पिंपळाच्या खोडाजवळ ठेवायचं आहे. कारण पिंपळाच्या वृक्षामध्ये अनेक देवीदेवतांचा वास असतो. तसेच धान्य ठेऊन प्रार्थना करा तुमची जी समस्या आहे ती बोलून दाखवा.

हे वाचा:   देवांना अंघोळ कशी घालावी? या चुका अजिबात करू नये? नाहीतर घराला लागतो दोष ….!!

आणि पिंपळाच्या झाडाच्या सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि घरी परत यायचं आहे. हा उपाय आपण जास्तीत जास्त वेळा करून पहा. काहींना 1 वेळस हा उपाय केलात तर फरक पडतो काहींना 21 वेळा हा उपाय करावा लागतो. जर तुमच्या घरात लाखो रुपये यायची असतील गरिबी निघून जाईल असे वाटत असेल किंवा तुमच्या स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करून घ्यायचं असेल.

तर तुम्ही 21 वेळा हा उपाय नक्की करून पहा. आणि चुकीची कर्म करणं बंद करा. जर तुमच्या हातुन कोणते पाप झाले असतील तर हे पाप घालवण्यासाठी हा उपाय करू शकता, दानधर्म करा, गोरगरिबांची सेवा करा.

काही लोकांना हा उपाय केल्याने पहील्याच वेळी फरक दिसेल काहींना 2 वेळा केल्यावर फरक दिसेल आणि 21 वेळा आपण हा उपाय केलात आणि आपले कर्म चांगले असेल आणि देवावर दृढविश्वास असेल तर हा उपाय 100% कार्य करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *