स्वामी लोकांना म्हणतात..अरे..!! भितोस कशाला, तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण  होई पर्यंत हवे तितके घे…!!

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो,

बसप्पा नावाचा अनन्य भक्त स्वामींची अनन्य सेवा करत असत..जिथे जिथे स्वामी तिथे तिथे बसप्पा..

बसप्पा गृहस्थाश्रमी होता. घरातील परिस्थिती नाजूक होती .पण स्वामी भक्तीचे त्याला इतके वेड लागले कि त्याचे घराकडे लक्षच नव्हते..

स्वामी सहवासात भरपूर ज्ञान स्वामीनी बसाप्पाला दिले.. त्याने पुन्हा प्रपंचात लक्ष द्यावे आणि स्थयिक व्हावे हे स्वामींच्या मनात यायला लागले..

ह्यातूनच एकदा फक्त बसाप्पा आणि स्वामी रात्री जंगलातून जात असतांना अचानक सर्प प्रगट झाले ..

हे सर्व बघून बसप्पा घाबरला ..तेव्हा स्वामी त्याला बोलले “ अरे, भितोस कशाला, तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ”

बसप्पा च्या काही लक्षात आले नाही पण स्वामी प्रती अनन्य भक्ती इतक्या उंचीवरची होती कि त्याने नि:शंक मनाने त्यातील काही सर्प झोळीत घेतले आणि घरी आले.

हे वाचा:   बायकोला झाली भूत बाधा……. कुणी म्हणाले गाणगापूरला न्या… आणि पुढे जे भलतंच घडलं ते वाचून अंगावर काटा येईल …!!

घरी आल्या नंतर जेव्हा बसाप्पाने झोळी बघितली तेव्हा त्या सर्पाचे सोने झालेले बघितले आणि आश्चर्याने स्वामी नामात नाचू लागला..

बोध — स्वामी भक्तीत राहिल्याने..स्वामींवर अतूट विश्वास ठेवल्याने स्वामी सापाचे (संकटांचे ) सोने (कृपा) करतात हा ह्या लीलेतून स्वामींचा संदेश होता..थोडक्यात ज्याचे स्वामींवर अनन्य भक्ती आहे त्यांनी संकटाना (सापाला) घाबरू नका कारण पुढे त्याचे सोनेच होणार आहे अशी स्वामी वाणी आहे .. धन्यवाद स्वामी ! कोटी कोटी धन्यवाद

आपला श्री स्वामी समर्थावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा.

टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

हे वाचा:   घरामध्ये कासव असेल तर ही एक चुक अजिबात करू नका नाहीतर संपूर्ण घर होईल बरबाद उपयुक्त अशी माहिती …!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *