मित्र मैत्रिणींनो चहा पिण्या अगोदर पाणी पीत असाल तर एकदा वेळात वेळ काढून नक्की वाचा उपयुक्त अशी माहिती …!!

आरोग्य

मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टींचे महत्त्व असते. या गोष्टी शिवाय आपण जगु शकत नाही त्यापैकी अशी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चहा. आपल्यापैकी अनेकांना चहा म्हणजे जीव की प्राण आहे. त्याशिवाय आपला एकही दिवस जात नाही. आपल्यापैकी अनेकजण असे आहेत की, जे सकाळी डोळे उघडल्यावर त्यांना बेड टी लागत असतो. दिवसभरातून तीन ते चार वेळा चहाचे कप लागत असतात किंवा अनेक जण असे सुद्धा आहेत की प्रत्येक कार्य हे चहा शिवाय अपूर्ण असते.

मित्रांनो जेव्हा आपण मित्रांना भेटतो तेव्हा हक्काचा चहा होतो. एखादी मीटिंग असते तेव्हा चहा होतो. एखादे आजारपणात आपण कोणाला भेटायला जातो तेव्हा चहा केला जातो किंवा जेव्हा एखाद्या व्यक्तीचे मंगल कार्य असते तेव्हा सुद्धा आवर्जून आपण चहा पीत असतो. चहा म्हणजे सर्व काही आहे म्हणूनच अनेकदा म्हटले जाते की, चहाला वेळ नसतो. पण वेळेला चहा आपल्याला पाहिजे.म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला चहा बद्दल माहिती तर सांगणार आहोत. पण अनेकदा चहा पीत असताना आपण अशा काही चुका करतो त्या चुका आपल्याला भविष्यात महाग पडू शकतात.

मित्रांनो त्या चुका म्हणजे नेमक्या काय आहेत व ती चूक आपल्याला कशा पद्धतीने सुधारायची आहे. याबद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

हे वाचा:   सकाळी उपाशीपोटी हे एक पान असे खा, BP, शुगर, पित्त, गोळी आयुष्यभर घ्यावी लागणार नाही, शरीरातील 72,000 नसा झटक्यात मोकळ्या ...!!

मित्रांनो आपण दिवसभरातून अनेकदा चहा पीत असतो. परंतु चहा पीत असताना काही चूक जर आपल्या हातातून घडली तर हीच भविष्यात अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकतो. तसेच अनेकदा आपण पाहतो की आपल्यापैकी काही जण चहा पिण्या अगोदर पाणी पीत असतात ही अत्यंत चुकीची सवय आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की, आपल्या शरीरामध्ये अन्नपचन होण्यासाठी शरीरात पित्त रस तयार होत असतात आणि यामुळे आपले शरीर शरीरातील अन्न व्यवस्थित रित्या पचवू शकते. परंतु त्याचबरोबर आपल्या शरीरात पाणी पचवण्यासाठी सुद्धा एक रासायनिक तत्त्व तयार होत असते ते म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड.

मित्रांनो, जेव्हा आपण पाणी पितो तेव्हा काही सेकंदांमध्ये हे ऍसिड आपल्या शरीरामध्ये तयार होते. आणि अशा वेळी जर आपण पाणी प्यायल्यानंतर त्वरित चहा प्यायलास चहामध्ये दूध मिक्स केलेले असते आणि यामुळे दुधातील घटक आणि आपल्या शरीरामध्ये जे एसिड तयार झालेले आहे ते एकत्र येऊन आपल्या शरीरामध्ये गंभीर समस्या निर्माण होतात. आणि या समस्यांमुळे आपल्या पोटाच्या अनेक समस्या निर्माण होतात व पोटाची गती मंदावते व त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एसिड तयार होतात आणि म्हणूनच चहा पीत असताना चहा पिणे आधी चुकून सुद्धा पाणी नाही प्यायला पाहिजे.

म्हणूनच अनेकदा जर तुम्हाला पाणी प्यायचे असेल तर चहा प्यायचा आधी अर्धा तास पाणी पिऊ नये. त्याचबरोबर चहा प्यायल्यावर सुद्धा अर्धा तास पाणी पिऊ नये. आपल्यापैकी अनेक जण चहा प्यायल्यानंतर सुद्धा पाणी पीत असतात. असे जर आपण केले तर आपले दात कमजोर बनतात आणि भविष्यात दात दुखी ची समस्या होऊ लागते आणि म्हणूनच गरम आणि थंड असे मिश्रण कधीच एकत्र सेवन करू नये. चहा पिण्याचे आपल्या शरीराला फायदे असतात. चहा पिल्याने आपण फ्रेश होवून पुन्हा पूर्ववत काम करण्यास पुढे सरसावत असतो.

हे वाचा:   नागिन, नागवेढा पूर्णपणे गायब करणारी ही एकच चमत्कारिक वनस्पती 100% प्रभावी ....!!

परंतु जर आपण चुकीच्या पद्धतीने चहा प्यायला तर आपल्या शरीराला त्याचा विपरीत परिणाम सुद्धा भोगावा लागतो. त्याचबरोबर उपाशीपोटी कधीच चहा पिऊ नये. कारण की, चहामध्ये कॅफेन नावाचे घटक असते. जर अशा वेळी उपाशीपोटी हे घटक आपल्या शरीरामध्ये मिसळले तर त्यामुळे सुद्धा अनेक समस्या निर्माण होऊ शकते आणि म्हणूनच जर तुम्ही सुद्धा चहा पिताना या पद्धतीच्या चुका करत असाल तर आत्ताच सावधान व्हा. अन्यथा तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *