लोक तुम्हाला चिल्लर समजतात कारण…… तुम्ही स्वतःला तसच दाखवता म्हणून, तुम्हांला या ११ आपल्याला गरज आहे ..!!

मनोरंजन

मित्रांनो, आपल्याला काही लोक चिल्लर समजत असतात. ते आपल्याला समाजामध्ये मान देत नाही. यामागचे कारण आपली वागणूक असते. आजच्या लेखांमध्ये आपण अशा काही आपला वर्तवणुकी बद्दलची माहिती घेणार आहोत की ज्यामुळे लोक आपल्याला समाजामध्ये मान देत नाही. अशा कोणत्या 11 गोष्टी आहेत की ज्यामुळे आपल्याला समाजामध्ये मान मिळत नाही. याचीच माहिती आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

1) गबाळ्यासारखं राहणं बंद करा. तुमच्याकडे कितीही ज्ञान असलं तरी समोरच्यावर तुमचं पहिलं इम्प्रेशन तुमच्या दिसण्याचे पडत. स्वतःला स्वस्त निरोगी आणि टॉप नीटनेटके ठेवा. नेहमी स्वच्छ कपडे घाला. आपल्याला बघताक्षणी समोरच्या व्यक्तीला प्रसन्न वाटायला हवं. कधी कधी लोक आपल्या राहणीमानावरून आपली किंमत ठरवत असतात. आणि आजकालच्या दुनियेत वर वरच्या सजावटीला जास्त महत्त्व दिलं जातं. सजावट म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेस मेकअप करूनच जावं असं नाही स्वतःला फक्त टापटीप आणि नीटनेटके ठेवा तेवढेही पुरेसं आहे.

2) कधीही कोणाला घाबरू नका. श्रीकृष्णाने भगवद्गीते मध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही कुठलेच वाईट काम करत नाही. वाईट मार्गाला नाही लागला आहात तर तुम्हाला कोणालाही घाबरण्याची गरज नाही कारण कोणीही तुमचं काहीही वाकड करू शकत नाही. म्हणून जेव्हा तुम्ही सत्य आणि खरं वागतात त्यावेळेस लोकांना हे दाखवून द्या की तुमच्या मनात कुठल्याच गोष्टीविषयी कसलीच भीती नाही.तुम्ही नेहमी सत्य आणि न्यायासाठी कायम्म ठाम उभे आहात. स्वतःला मजबूत दाखवले तर लोक तुम्हाला मान देणार भित्र्या माणसाला कोणीही विचारत नाही. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सत्याचा आणि चांगल्या गोष्टींचा मार्ग कधीही सोडायचा नाही आणि सोडला नाही तर कधीही कोणाला घाबरून राहण्याची अजिबात गरज नाही.

3) नेहमीच प्रत्येक वेळेस जो म्हणेल त्याच्यासाठी अवेलेबल राहू नका. कोणीही आवाज दिला काही छोटे मोठे काम असेल तर लगेच तुम्ही हातातलं काम सोडून समोरच्याकडे धावत पळत जाता आणि मग समोरच्या व्यक्तीला देखील ही सवय होते की त्याच्या प्रत्येक बोलण्यावर तुम्ही त्याच्याकडे धावून जातात. म्हणून समोरच्या व्यक्तीला तुमची काहीही किंमत राहत नाही.आपल्या जवळ नेहमी असणाऱ्या गोष्टीची आपल्याला कधीच किंमत नसते तसंच माणसाच आहे. समोरच्यासाठी तुम्ही जितके जास्त अवेलेबल राहणार तेवढ्या जास्त तुमचा फायदा घेतला जाणार आणि तुमची किंमत कमी होत जाणार. इतरांना मदत नक्की करा पण स्वतःचा मान ठेवून.

4) दिलेला शब्द कधीही मोडू नका. इतरांमध्ये आपली इमेज अशी ठेवा की आपल्या शब्दांना मान असेल आणि आपण जेव्हा एखाद्याला शब्द देऊ वचन देऊन तेव्हा ते तुम्ही मोडता कामा नये. कारण तुमच्या शब्दांना तेवढा मान असणार आहे. कलियुग आहे असं म्हणतात इथं खऱ्या पेक्षा खोटे जास्त वावरता. फसवणूक करणारे जास्त मिळतात. अशा वेळेस आपण इमानदार राहून आपल्या शब्दाला जागणं गरजेचा आहे. जो स्वतःचा शब्द पाळतो तो इतरांच्या नजरेत कायम महत्त्वाचा आणि सन्माननीय असतो.

हे वाचा:   रागाचे औषध जन्मभर तुम्हाला राग येणार नाही…… फक्त एकदा वेळ काढून वाचा ….!!

5) वेळेची किंमत करा. मग ती वेळ आपली असो किंवा इतरांची असो. इतरांसमोर भेटण्यासाठी आपण ठराविक वेळ दिली आहे आणि आपणच त्या वेळेला तिथे हजर नसू याला काहीही अर्थ नाही. वेळेची किंमत न करणाऱ्या माणसाची वेळही कधी किंमत करत नाही आणि इतर लोकही कधी किंमत करत नाहीत.आपल्या वेळेच्या बाबतीत कायम वक्तशी राहा. मग ती वेळ इतरांना दिलेली असं. किंवा स्वतःच्या कामांसाठी दिलेली असो ज्या त्या वेळेत ते काम पूर्ण करा. वक्तशीर असणारा व्यक्ती प्रत्येकालाच आवडतो आणि त्याचा वेगळा प्रभाव समोरच्यावर पडतो हे कायम लक्षात असू द्या.

6) तुमचं जे काही क्षेत्र असेल व्यवसाय असेल नोकरी असेल त्यात यशस्वी व्यक्ती व्हा. तुम्हे ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रात तुमचं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कामाकडे आणि तुमच्याकडे बघून इतर लोकांना तुमच्याकडून काहीतरी घेण्याची शिकण्याची इच्छा व्हायला हवी इतकं तुम्ही तुमच्या कामात क्षेत्रात यशस्वी असायला हवं. तुमच्याकडे ज्ञान आहे कौशल्य आहे पण ते तुम्हाला वापरता येत नाही. जगासमोर मांडता येत नाही. त्याचा फायदा घेत आहेत. नाही यशस्वी होण्यासाठी तर त्याचा काहीही उपयोग नाही. लोक तुमच्याकडे काय आहे हे बघत नाहीत तुम्ही किती सक्सेसफुल आहात तुमचं स्टेटस काय आहे हे पाहतात. म्हणून स्वतःच्या करिअर कडे लक्ष द्या एक यशस्वी व्यक्ती होण्याचा प्रयत्न करा लोक आपोआप मान देतील.

7) स्पष्ट आणि सडेतोड राहा. तुमच्या बोलण्यात आत्मविश्वास असू स्पष्टवक्तेपणा असू द्या. कारण घाबरणाऱ्या आणि दबून राहणाऱ्या लोकांना समाज किंवा समाजातील इतर लोक आणखी दाबण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आपली मत ठाम असू द्या. आपल्याला कोणीही पोसायला किंवा भाकरी द्यायला येत नाही. आपण स्वतःच्या मेहनतीचा खातो. म्हणून आपल्या बोलण्यात स्पष्टवक्तेपणा असू द्या. कोणालाही घाबरून किंवा दबून राहण्याची गरज नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुम्ही जेवढे जास्त घाबरून आणि दाबून राहणार तेवढ्या जास्त तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न होणार. कायम समोरच्या नजरेला नजर मिळवून बोला. तुमच्या स्पष्ट वक्तेपणामुळे लोक तुमच्या वाट्याला जाणार नाही आणि तुम्हाला कमी समजणार नाहीत.

8) आपल्या कमजोर बाजू किंवा एकंदरीत आपली सगळीच सुखदुःख इतरांना सांगत बसू नका. सगळ्यांच्या आयुष्यात दुःख, संघर्ष, वाईट वेळ ही असतेच. आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहोत संघर्ष हा आपल्या जगण्याचा आणि जीवनाचा भाग आहे. आणि आपल्या संघर्ष आपला वाईट काळ किंवा आपण कसे दुःखात आहोत हे इतरांना सांगून आपलं दुःख कमी होत नाही किंवा त्याचा काही फायदाही होत नाही. उलट लोक आपली खिल्ली उडवतात मजा घेतात. आपण कमजोर बाजू इतरांना सांगून आपण आपल्यावर इतरांना कुरघोडी करण्यासाठी एक आयती संधी उपलब्ध करून देतो. म्हणून कितीही दुःख येऊ देत. आपल्याकडे कितीही कमजोर बाजू असू देत ते इतरांना सांगू नका. आपल्या कमजोर बाजूंना आपल्या ताकदीत आपल्या स्ट्राँग बाजूत कशा बदलायच्या याचा प्रयत्न करा.

हे वाचा:   पुरूषांच्या ‘या’ 5 सवयींवर एका मिनिटात आकर्षित होतात महिला…!!

9) सगळ्यांसोबत प्रेमाने राहा. तुम्ही इतरांशी प्रेमाने वागलात तर समोरचा ही तुमच्या प्रेमाने वागेल. तुम्ही समोरच्याला मान दिला तर तुम्हालाही मान मिळेल. आपण प्रेमाने आपली अशी काही नाती मिळवू शकतो ज्या नात्यांमध्ये आपला कधीच अपमान होणार नाही. प्रेमाने तुम्ही जग जिंकू शकता. इतरांशी प्रेमाने वागणारी आणि सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणारी व्यक्ती अशा व्यक्तीचा सगळेजण मान ठेवतात. भांडखोर चिडचिड्या आणि तुसडेपणाने वागणाऱ्या व्यक्तीला लोक कायम नाव ठेवतात. आपल्या व्यक्तिमत्वात आपल्या स्वभावात इतरांबद्दल प्रेम काळजी आदर मान सन्मान हे सगळे गुण असायला हवे. जी एका सभ्य आणि सुसंस्कृत माणसाची लक्षणे असतात.

10) स्वतःमध्ये काहीतरी टॅलेंट कौशल्य असू द्या. आजकालच्या जमाना टेक्नॉलॉजीचा फॉरवर्ड झालेला आहे. तुमच्यामध्ये काळानुसार काय कौशल्य आहे काय नवीन स्किल आहे याकडे लोकांच पटकन लक्ष जातं. स्वतःमध्ये काहीतरी कौशल्य असू द्या आणि नसतील तर ती शिकून घ्या. रोज स्वतःला अपडेट ठेवा. काहीतरी नवीन शिका जेणेकरून लोकां तुमच्याकडे लक्ष जाईल आणि तुमची कौशल्य लोकांवर प्रभाव पडतील. आपल्यामध्ये इतरांपेक्षा काहीतरी वेगळं असल्याशिवाय आपण इतरांमध्ये उठून दिसत नाही वेगळे दिसत नाही. म्हणून स्वतःमध्ये कौशल्य स्किल डेव्हलप करा.

11) सगळ्यात महत्त्वाचं आणि आजच्या जमान्याला तंतोतंत लागू होणारी गोष्ट म्हणजे पैसा आहे. तर माणसं मान सन्मान आहे इज्जत आहे. तो काळ गेला जेव्हा पैशाला नाही माणसांना किंमत होती आजच्या काळात माणसाला नाही पैशाला किंमत आहे. तुमच्याकडे पैसा असेल तर त्याचा माज करू नका पण लोकांना दिसेल इतका तर पैसा कमवा.चार पैशासाठी लोकांनी तुमचा अपमान करता कामा नये. आणि आपल्याकडे चार पैसे जार आले म्हणून आपल्याला माज आणि अहंकार येता कामा नये. पैसा तर कमवा श्रीमंत व्हा आणि त्या पैशासोबत आपले पाय नेहमी जमिनीवर असू द्या. या दोन गोष्टी तुम्हाला जमल्या तर लोकांना तुम्हाला कसलाच मानसन्मान मागण्याची गरज नाही आपोआप तो तुम्हाला मिळेल.

अशाप्रकारे या होत्या त्या अकरा गोष्टी ज्या तुमच्यात असतील तर लोक तुम्हाला नक्की मान ठेवतील. खरंतर या सगळ्या गोष्टी आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग आहेत पण आपण त्या विसरतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *